पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनवट सातारा भाग - २ : साताऱ्याचे ॲमेझॉन काठी-अवसरी

इमेज
  साताऱ्याचे ॲमेझॉन  काठी-अवसरी नजर पोहचेल तिकडे घनदाट जंगल, दऱ्या खोऱ्यांमध्ये पसरलेले विभिन्न रंगाचे अथांग पाणी, ऑक्सिजनचा मुबलक साठा, प्रदूषणाचा लवलेशही नाही, पाण्यात सूर मारून मासा पकडून वर झेप घेणारे पक्षी, समृद्ध जैवविविधतेसह अतुलनीय सौंदर्य, ढगाला गवसणी घालणाऱ्या पर्वतरांगा हे काय ॲमेझॉनचे वर्णन नाही. हे तर आहे आपल्या साताऱ्यातच. पाटण तालुक्यातील वनकुसवडे पठाराच्या छायेत, शिवसागर जलाशय आणि कोयना अभयारण्याच्या कुशीत प्रत्येकाला साद घालणारी हे दोन गावे म्हणजे काठी आणि अवसरी. पाटणपासून २९ कि.मी. तर साताऱ्यापासून ४६ किमी अंतरावर ही दोन गावे वसलेली आहेत. तसेच कोयना धरणापासून हे अंतर ११ किमी असून लाँचने सुध्दा या परिसरात येऊन फेरफटका मारता येतो. सातारा - गजवडी- ठोसेघर - चाळकेवाडी - वनकुसवडे - काठीटेक - अवसरी - काठी असा प्रवास करून  सातार्‍याच्या ॲमेझॉनला पोहोचता येते. साताऱ्याहून जाताना वाटेतच समर्थांचा सज्जनगड, ठोसेघरचा उंच दरीतून कोसळणारा मोठा आणि त्याच्याच वर असलेला छोटा धबधबा, चाळकेवाडी - वनकुसवडे पठारावरील बहरलेली रंगबेरंगी फुले, आशिया खंडातील सर्वात मोठ्या पवनऊर्ज...

युद्ध नको बुद्ध हवा!

इमेज
  युद्ध नको बुद्ध हवा!  अंधारात चाचपडणार्‍या जगाला माणुसकीचा दिवा हवा धर्म जातीच्या आधारे एकमेकांचा गळा घोटणाऱ्या व्यवस्थेला समानतेचा संदेश हवा  युद्ध नको बुद्ध हवा!  स्वार्थासाठी हैवान बसलेल्यांना प्रेमाचा ओलावा हवा खोट्या राष्ट्रभक्तीचा बुरखा पांघरलेल्यांना देशभक्तीचा हुंकार हवा युद्ध नको बुद्ध हवा!  सोशल मीडियाच्या युगात गरळ ओकणाऱ्यांना नैतिकतेचा आरसा हवा  वाट चुकलेल्या वाटसरूंना विवेकी रस्ता हवा  युद्ध नको बुद्ध हवा!  व्यवस्थेने नाकारलेल्यांना जगण्याचा आधार हवा  रक्ताच पाणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला सन्मानाचा भाव हवा  युद्ध नको बुद्ध हवा!  देश रक्षणासाठी तळहातावर प्राण घेतलेल्या सैनिकास आपल्या प्रेमाचा सलाम हवा  भारत भूच्या अंगा-खांद्यावर खेळणाऱ्या प्रत्येकाच्या नसानसात भारत माझा देश हवा  भारत माझा देश हवा  युद्ध नको बुद्ध हवा!  युद्ध नको बुद्ध हवा!  डॉ. सुभाष कारंडे, सातारा   

दरड दुर्घटनेतील बळी? नव्हे सरकारी अनास्थेचे बळी!

इमेज
रायगड जिल्ह्यातील खालापूरमधल्या इरशाळवाडी गावावर दरड कोसळून २७ लोक मृत्युमुखी पडले, ५७ जण बेपत्ता असून १४४ लोक बचावले आहेत. तब्बल २२ विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे मायेचे छत्र हरपल्याने ते अनाथ झाले आहेत. थोडक्यात ८४ लोक या घटनेमध्ये मृत्युमुखी पडले असेच म्हणावे लागेल आणि एक गाव जगाच्या नकाशावरून नाहीसे झाले.  यापूर्वी २००५ मध्ये नवी मुंबई जवळील खारघर व नेरूळ, मुंबईमधील साकीनाका आणि ताडदेव, सातारा जिल्ह्यातील भिलार आणि रायगड मधील दासगाव, रोहन, जुई आणि कोंडीवते येथे दरड कोसळून तब्बल ३०० लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक बेघर झाले. २००९ मध्ये मुंबईतील अंधेरी येथे दरड कोसळल्यामुळे १२ लोकांचा मृत्यू झाला. २०१० मध्ये रत्नागिरीतील हरणाई येथे दरड कोसळून आठ लोकांचा मृत्यू झाला.  २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीण दरड दुर्घटनेमध्ये २५१ लोकांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण गाव पुनर्वसित करण्यात आले. २०१५ मध्ये मुंबई-पुणे महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून ३ लोकांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये रायगडमधील तळीये या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे ८४ लोक मृत्यूमुखी पडले. याचवर्षी सातारा जिल्ह्यातील आंबेघर,...

अनवट सातारा भाग - १ : साताऱ्याचा दुधसागर उंबरी धबधबा

इमेज
साताऱ्याचा दुधसागर उंबरी धबधबा महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केल्याने शहरातील पर्यटकांसोबतच ग्रामीण भागातील पर्यटक विविध ठिकाणांना वर्षभर भेटी देत असतात. पावसाळ्यात धो-धो कोसळणारा पाऊस, अंगाला झोंबणारा गार वारा, सड्यावर फुललेली रंगीबेरंगी फुले, स्वर्ग सुखाची अनुभूति देणारे येथील धबधबे आणि हिरवेगार डोळ्यांचे पारणे फेडणारे सह्याद्रीचे डोंगर यांचा याच देही याच डोळा आनंद लूटण्यासाठी महाराष्ट्रभरातील असंख्य पर्यटकांची पाऊले साताऱ्याकडे वळतात. भारतातील सर्वात उंच धबधबा म्हणून वजराई धबधब्याची ओळख महाराष्ट्रासह भारतात सर्वदूर पसरली असल्याने कास पठाराला भेट देणारे अनेक पर्यटक येथे आवर्जून भेट देतात. याचबरोबर दोन टप्प्यांमध्ये म्हणजेच लहान आणि मोठा असा बाराही महीने कोसळणारा ठोसेघर धबधबा, कोयना धरणाच्या जवळील ओझर्डे धबधबा, अलीकडेच पर्यटकांचे आकर्षण ठरत असलेला एकीव धबधबा, महाबळेश्वर आणि पाचगणीला येणाऱ्या सर्व पर्यटकांचे विशेष आकर्षण असणारा भिलार आणि लिंगमळा धबधबा, वाऱ्याच्या वेगामुळे पश्चिमेकडे जाणारे पाणी पुन्हा पूर्वेकडे फेकलं जातं आणि उंच आकाशात उडाल्या...